Hemant Desai

PM Narendra Modi, Election Commission, Model Code of Condut

मोदींचा निवडणूक आचार आणि व्यवहार!

Opinion
२०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक जिंकण्यासाठी आचारसंहिता खुंटीला टांगून ठेवण्याचे उद्योग सुरू केले होते. एकेकाळी अशाच कृत्याबद्दल इंदिरा गांधींना मोठी किंमत चुकवावी लागली होती.
इंडी जर्नल

मोदींचे शक्तिहीन दास!

Opinion
भाववाढ कमी करण्यात रिझर्व्ह बँक, तसेच मोदी सरकारला बिलकुल यश मिळालेले नाही. परंतु स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घ्यायीच असेल, तर कोण काय करू शकेल? तसेच हजारो कोटी रुपयांची कर्जे निर्लेखित करून ताळेबंद स्वच्छ करणे, याला तसा काही अर्थ नाही. लाखो कोटी रुपयांची कर्जे माफ केली जात आहेत, त्याचे काय?
Praful Patel, Kejriwal, corruption

हे कोणाला ‘पटेल’?

Opinion
मोदीजींनी फारसा विकास केला नसूनही, ते ‘भ्रष्टाचारसंहारक’ आणि 'विकासपुरुष' असल्याची प्रतिमा या मंडळींनी निर्माण केली. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री सकाळी हातपायतोंड धुवून, मग लगेच पैसे खायला बसतात, अशाप्रकारचे समीकरण त्यांनी ठळक केले आहे.
Electoral Bonds, BJP

राजकारणातील क्विड प्रो क्वो!

Opinion
गेल्या पाच वर्षांत अलग अलग राजकीय पक्षांनी वठवलेल्या १२,७६९ कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांपैकी जजवळपास निम्मे रोखे हे सत्ताधारी भाजपला मिळाले असून, त्यापैकी एक तृतीयांश रोख्यांची रक्कम २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी वापरली गेली आहे. आयोगाने जाहीर केलेल्या रोखे खरेदीदारांच्या यादीत सर्वात मोठ्या पाचपैकी तीन खरेदीदारांनी सक्तवसुली संचलनालय, म्हणजेच ईडी आणि प्राप्तिकर विभागाकडून चौकशी सुरू असताना हे रोखे खरेदी केले आहेत.
yashwantrao chavan, maharashtra, marathi

यशवंतरावांचा महाराष्ट्र बिघडवू नका!

Opinion
बाबासाहेब असोत की यशवंतराव; त्यांचे मन विशाल होते. त्यांच्या राजकारणात माणुसकीचा गहिवर होता. सर्व भाषक, जाती, धर्मातल्या वंचितांचा विचार हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. महाराष्ट्रातील नेतृत्वाकडून आज अशा दृष्टीची अपेक्षा आहे.
bal thackeray, shiv sena, hindutva

भाजपवाल्यांनो, तुमची उपरणी सावरा

Opinion
'शिवसेनेने हिंदुत्वाला सोडचिठ्ठी दिली', असा भाजपाचा युक्तिवाद असतो. परंतु शिवसेनेची स्थापना मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी झाली होती.

काय होतास तू, काय झालास तू!

Opinion
कोणताही राजकीय पक्ष मोठा होतो, तेव्हा त्याचे व्यक्तिमत्त्वही बदलत असते. भाजपमध्ये पूर्वी चुकीच्या गोष्टींवर पांघरूण टाकण्याऐवजी किंवा त्यांचे लटके समर्थन करण्याऐवजी, संबंधितांवर कारवाई करण्याकडे वाजपेयी, अडवाणींचा भर असे. आज मात्र काँग्रेसला 'पापी' ठरवताना, आपल्या पक्षाची प्रतिमा आज काय आहे, पूर्वी ती काय होती, आपल्या पक्षातील नेत्यांनी काय काय उद्योग केले, याचा विश्वगुरूंना विसर पडला आहे.
Jansangh, INDIA, BJP

आम्ही केली, तर ती श्रावणी...

Opinion
भाजपने अनेकदा विचारसरणी खुंटीला बांधून ठेवली आहे. परंतु हीच तडजोड सोनिया गांधी, मनमोहन सिंग, शरद पवार, उद्धव ठाकरे वा अन्य कोणी केली, तर भाजप त्यांना स्वार्थी, भ्रष्ट, देशद्रोही, हिंदुत्वविरोधी वगैरे ठरवते.
Maharashtra politics, bjp, defection, ashok chavan

भाजपच्या बेरजेची टोटल काय?

Opinion
सत्ता व पक्षविस्तारासाठी काहीही करण्याची तयारी असणे, हीच भाजपची आता विचारसरणी बनली आहे. भाजपच्या या बेरजेच्या राजकारणाची काही टोटलच लागत नाही... मात्र जनतेची सहानुभूती आणि प्रेम उद्धव ठाकरे, शरद पवार व राहुल गांधी यांनाच मिळत आहे.
Jawaharlal Nehru, BJP, Narendra Modi

नेहरू आडवा येतो

Opinion
आज ओबीसी जातगणनेचा मुद्दा राहुल गांधी आणि लालूप्रसाद यादव प्रभृतींनी लावून धरल्यामुळे भाजप अस्वस्थ झाला आहे. म्हणूनच त्यानंतर कर्पूरी ठाकूर यांना घाईघाईत ‘भारतरत्न’ दिले गेले. नेहरूंना ‘आरक्षणविरोधी’ ठरवून, मोदीजींना फक्त नेहरू घराण्याला बदनाम करायचे आहे.
इंडी जर्नल

मंडलवाद्यांचे मोदीस्तोत्र!

Opinion
बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, शरद यादव, लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान हे कर्पूरीजींचे शिष्यच. कर्पूरीजींच्या विचारांपासून स्फूर्ती घेतच नीतीशकुमार यांनी बिहारमध्ये ओबीसींची जातगणना केली. एकेकाळी मंदिराला उत्तर म्हणून व्ही. पी. सिंग यांनी मंडलचे अस्त्र परजले होते. या मंडलवादाचा परिणाम म्हणूनच बिहारमध्ये सामाजिक न्यायाचे राजकारण करणारे अनेक नेते प्रकाशात आले आणि सत्तेतही.
Ram Temple, BJP, Congress

राम का नाम बदनाम न करो...

Opinion
काँग्रेसने एक पक्ष म्हणून राम मंदिरासंबंधी आपली भूमिका स्पष्ट केलीच नाही. अयोध्येतील राम मंदिर हे सत्यवचनी व न्यायी रामाप्रमाणेच राष्ट्रीय एकात्मतेचे एक प्रतीक बनावे, अशी भूमिका मांडणे काँग्रेसला शक्य होते. मात्र काँग्रेसमध्ये सध्या कोणीही सैद्धांतिक मांडणीच करत नाही.
Modi poverty

गरिबीचेच भांडवल!

Opinion
देशातील गरिबी कमी होत आहे, ही आनंदवार्ताच आहे. परंतु गरिबी संपूर्णपणे नष्ट करणे, हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे. एकमेकांना राजकीय दूषणे देऊन गरिबी कधीच हटणार नाही!
Shiv Sena, Maharashtra, Eknath Shinde, BJP

मध्यमवर्गाचा धृतराष्ट्र!

Opinion
महाराष्ट्राचे राजकारण आता नीचतम पातळीला गेले आहे. सर्व्हेजमधून अजूनही महाविकास आघाडी पुढे असली, तरी भाजप हा मध्य प्रदेश, छत्तीसगडप्रमाणेच प्रतिकूलतेचे रूपांतर अनुकूलतेत करून यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे सहानुभूती आम्हालाच आहे, या कैफात न राहता, महाविकास आघाडीने एकजुटीने कामाला लागले पहिजे.
मोदीजी माध्यमांवर नजर ठेवताना

सरकारचे ‘शेळी’पालन!

Opinion
आज अशी स्थिती आहे की. सरकारविरोधातील आवाज ऐकण्यासाठी एकही हक्काचा चॅनेल उपलब्ध नाही. दुसरीकडे, कोणत्याही चर्चात्मक कार्यक्रमात काँग्रेसला ठरवून लक्ष्य करणाऱ्या अँकर्सवर अखेर काँग्रेस पक्षाला बहिष्कार घालावा लागला. काँग्रेसची स्वतःची विश्वासार्हता काय आहे, हा स्वतंत्र प्रश्न आहे. परंतु पूर्णपणे भाजपचा अजेंडा राबवणाऱ्या अँकर्सना एक्सपोझ करणे हे अत्यंत गरजेचे होते.
अडाणी, अंबानी, टाटा, मोदी

राजकारणी आणि उद्योगपतींची अंगतपंगत

Opinion
काँग्रेसला झोळी घेऊन आज दारोदारी फिरावे लागत आहे. तर भाजपकडे पैसा ठेवण्यास तिजोऱ्या कमी पडत आहेत. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांची सत्ता गेली, तेव्हा त्यांच्या खात्यात फक्त २४१० रुपये होते. पण आपल्या गरिबीची त्यांनी कधी जाहिरात केली नाही. चोकसी, मोदी, मल्ल्या यांनी हजारो कोटी रुपये बुडवले आणि पोबारा केला. अद्यापही ते परदेशात मौजमस्ती करत आहेत.
Modi,Dhankar,Emergency

हुकूमशाहीची गॅरंटी!

Opinion
आज भारत गरुडझेप घेण्यास सज्ज आहे, हे समस्त भारतवासीयांना टाऊक आहे. म्हणूनच २०२४च्या लोकसभा निवडणुकीत आम्हीच जिंकणार आहोत, असा आत्मविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडनच्या ‘द फायनॅन्शियल टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला आहे. मात्र या मुलाखतीत मोदींनी धादान्त असत्यकथन केले आहे.
Election Commission

निवडणूक आयोग की ताटाखालचे मांजर?

India
केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेतून सरन्यायाधीशांना वगळून, त्यावर पूर्णपणे सरकारी नियंत्रण प्रस्थापित करणारे वादग्रस्त विधेयक राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले आहे. लोकसभेत सत्ताधारी पक्षाचे बहुमत असल्या कारणाने ते मंजूर होणार, यात कोणतीही शंका नाही. निवडणूक आयोगाला सहजपणे गुलाम बनवण्यासाठी करण्यात आलेली ही अधिकृत व्यवस्था आहे.
narendra modi, assembly elections, rahul gandhi, congress

मोदी को हराना मुश्किल है, लेकिन...

Opinion
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या असून, त्यापैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत आहे. राजस्थान व मध्य प्रदेश यापैकी एक राज्य जरी काँग्रेसला परत मिळाले, तरी ‘मोदी है तो मुमकिन है’ या घोषणेतील हवा निघून जाईल.
Amit Shah and Election Commission

धर्मवादाची पोळी आणि बिनकण्याचा आयोग

Opinion
निवडणुकीत धर्मावर आधारित विधान करून मतदान मागता येत नाही, हा नियम आता निवडणूक आयोगाने शिथिल केला आहे काय? आचारसंहितेतील बदल फक्त मोदी-शहांसाठी केला आहे का? असे सवाल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रास्तपणे केले आहेत.
Narendra Modi, Adani, BJP Corruption

खाऊंगा और खिलाऊंगा भी!

Opinion
एडीआरनुसार २०२०-२१ मध्ये भाजपच्या मालमत्तेमध्ये ४,९९० कोटी रुपयांवरून ६,०४६ कोटी रुपयांवर अशी २१ टक्क्यांची वाढ झाली. काँग्रेसच्या मालमत्तेमध्ये त्याच काळात ६९१ कोटी रुपयांवरून ८०५ कोटी रुपयांवर, म्हणजे फक्त १६ टक्क्यांचीच वाढ झाली. तरीही काँग्रेस हा भ्रष्ट आणि पैसेखाऊ पक्ष, अशी प्रतिमा भाजपने करून ठेवली आहे.
हेमंत देसाई जयंत पाटील

जयंत पाटील: एक दृष्टिक्षेप

Opinion
पवार अडतिसाव्या वर्षी मुख्यमंत्री झाले, तेव्हा एस.एम जोशी, गणपतराव देशमुख, एन.डी. पाटील, उत्तमराव पाटील यांच्यासारख्या सामाजिक कामे उभी करणाऱ्या तसेच वैचारिक पाया असलेल्या नेत्यांच्या सहवासात ते आले. जयंतरावांनी जशी नेतृत्वाची एक फळी उभी केली, तशीच पवारांनीही ती उभी केली. आता त्यापैकी काही नेत्यांनी त्यांच्याशी गद्दारी केली असली, तरीदेखील अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड आणि मुख्य म्हणजे, जयंत पाटील यांच्यासारखे नेते पवारांशी एकनिष्ठ राहिलेले आहेत.
Raju Shetti

राजू शेट्टी यांचा ‘आक्रोश’

Opinion
राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांसाठी २२ ऑक्टोबरपासून ‘आक्रोश पदयात्रा’ सुरू केली होती. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आणि आपल्यासारखाच एक कार्यकर्ता आरक्षणासाठी जीव पणाला लावत असताना, आपण फुलांचे हार गळ्यात घालणे पटत नसल्यामुळे चौदाव्या दिवशी शेट्टी यांनी पदयात्रा स्थगित केली.
शिवतीर्थ दसरा मेळावा Dasra Melava २०२३ shivsena

शिवतीर्थावरून ठाकरेंनी पाजले शिंदेंना तीर्थ!

Opinion
‘या दिवाळीत चिवडे दोन’ अशी एका कंपनीची प्रसिद्ध जाहिरात आहे. त्याच पद्धतीने, गेल्या वर्षी आणि यंदाही ‘या दसऱ्याला मेळावे दोन’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. मात्र या दोन्ही मेळाव्यांत जमीन अस्मानाचा फरक होता.
Meeran Borwankar, Ajit Pawar, Pune, Mumbai

सलाम, मीरन मॅडम!

Opinion
गृहखात्याची येरवडा येथील मोक्याची जागा एका खासगी बांधकाम व्यावसायिकाला लिलावात देण्यासाठी दबाव आणण्याचा आरोप निवृत्त पोलीस अधिकारी मीरन बोरवणकर यांनी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर केल्यानंतर धमाल उडाली.
गाझा, इस्रायल संघर्ष

गाझामधली आग

Opinion
हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने प्रतिहल्ल्याच्या नावाखाली विध्वंसाची परमावधी गाठली. या दोन्हींचा तितक्याच तीव्रतेने धिक्कार करणे आवश्यक आहे. भारत सरकारने सुरुवातीला काहीसे एकतर्फी निवेदन काढले. परंतु नंतर पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याला भारताचा पाठिंबा कायम असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
पुतीन, मोदी, सुडाचं  ,न्युजक्लीक पत्रकार

नऊ वर्षांचा सुडाचा प्रवास

Opinion
मोदी सर्वच विरोधी पक्षांवर ते भ्रष्ट असल्याचा आरोप करत सुटले आहेत. म्हणजे जे आपल्याबरोबर नाहीत, त्यांना शत्रुस्थानी मानले जात आहे. विरोधी विचाराच्या संस्था बळकावण्याचाही प्रयत्न सुरू असतो.
नरेंद्र मोदी आणि गांधीजी मीडिया लाईन

मोदी आणि गांधी

Opinion
दुसऱ्याला जगण्यास मदत करणे व त्यात येणारे सारे अडसर दूर करून सहयोगात्मक सहजीवन अस्तित्वात आणणे, हा अहिंसेचा सकारात्मक अर्थ गांधीजींना अभिप्रेत होता. मात्र आपण गांधीजींचे नवपट्टशिष्य असल्याचा आविर्भाव आणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या ‘गुरू’च्या उपदेशाचा विसर पडला असावा.
Media Line, Hemant Desai, Difference Between Mavlankar and Narvekar

कुठे मावळणकर आणि कुठे नार्वेकर!

Opinion
फलटण येथे नार्वेकर यांचा सत्कार झाला असताना, त्यांनी 'मी क्रांतिकारक निर्णय घेणार असल्याचे' जाहीर केले होते. आता ही क्रांती कोणाच्या फायद्याची असेल, याचा केवळ आपण अंदाजच लावू शकतो. स्वातंत्र्यपूर्व काळात ग.वा. तथा दादासाहेब मावळणकर यांच्यासारखी थोर व्यक्ती मुंबई राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी होती. त्यांनी अनेक आदर्श परंपरा निर्माण केल्या.
Uddhav Thackeray Chandrakant Bawankule Media Line

राजकारणातील कर्ब-उत्सर्जन

Opinion
देशात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण होऊनही नऊ वर्षे लोटली आहेत. २०१४ साली मोदीपर्व सुरू झाल्यानंतर, राजकारणातील कर्ब-उत्सर्जन वाढलेच.
इंडी जर्नल

उत्सवी राजकारणाचे ढोलताशे

Opinion
निवडणुकीत यश मिळवण्यासाठी कोणत्याही टोकाला जायची तयारी हे ‘मोदीत्वा’चे आद्य वैशिष्ट्य आहे. २०१९ साली भाजपला ३०३ जागा मिळाल्या व ३७ टक्के मते मिळाली. परंतु ही मते लोकांनी हिंदू राष्ट्रवादासाठी दिलेली नाहीत. शिवाय ६३ टक्के मते ही भाजपला मिळालेली नाहीत, हे ध्यानात घेऊन त्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे.
Indie Journal

समृद्ध भारत, नया भारत!

Opinion
पशुधनाच्या चाऱ्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून दलित महिलेस अल्पवयीन मुलासह फरफटत आणत, निर्घृणपणे मारहाण केल्याची घटना नुकतीच माण तालुक्यातील पानवण गावात घडली. महाराष्ट्रासारख्या शाहू-फुले-आंबेडकर यांच्या नावांचा सकाळ-संध्याकाळ गजर करणाऱ्या राज्यात अशा घटना घडत आहेत, याला काय म्हणावे?
Indie Journal

विश्वगुरुंच्या कल्पनेतली लोकशाही

Opinion
मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी नेमण्यात आलेल्या समितीमधून सरन्यायाधीशांचे नाव वगळून, त्याऐवजी एका केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्याची तरतूद असणारे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले आहे. याचा स्पष्ट अर्थ असा की, निवडणूक आयुक्तांच्या निवडीवर केंद्र सरकारचे नियंत्रण प्रस्थापित होणार आहे.
इंडी जर्नल

काँग्रेसनं आपलं मैदान ठरवून घ्यावं!

Opinion
काँग्रेसने अनेक वर्षे फक्त आणि फक्त मुसलमानांचे लांगुलचालन केले, असा आरोप करून भाजपने हिंदू मतांचे ध्रुवीकरण केले. आपली केंद्रातील सत्ता गेल्यानंतर काँग्रेसने आपल्या इमेजचा इतका धसका घेतला की, मुस्लिमांबद्दल बोलणेच जवळजवळ सोडून दिले.
Indie Journal

कचखाऊ सुशीलकुमार शिंदे

Opinion
देशात भगव्या व हिंदू दहशतवादास रा. स्व. संघ आणि भाजप उत्तेजन देत आहेत, असे उद्गार शिंदे यांनी काढले होते. त्यावेळी भाजपने शिंदे यांच्यावर चौफेर हल्ला चढवत माफीनाम्याची मागणी केली होती. हे वक्तव्य मागे न घेतल्यास, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू न देण्याचा इशारा भाजपने दिला होता.
Indie Journal

लोकशाहीप्रेमाची आवई!

Opinion
विरोधी पक्ष कधी इतके दिशाहीन व वैफल्यग्रस्त झालेले मी पाहिले नव्हते. त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीनंतरही विरोधी बाकांवरच बसायचे असावे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच भाजपच्या संसदीय बैठकीत बोलताना केला. विरोधी पक्षांबद्दल आत्यंतिक द्वेषभावना बाळगणारे पंतप्रधान, आपल्या लोकशाही प्रेमाची द्वाही फिरवत असलेले दिसतात.
Indie Journal

दो हंसों का नया जोडा!

Opinion
अजितदादांवरदेखील देवेंद्रजी तेव्हा टीका करत असले, तरी त्याला व्यक्तिगत स्वरूप कधीही आलेले नव्हते. दादा आणि देवेंद्रजी यांच्यातील संबंध उत्तमच होते. देवेंद्र जे जे मुद्दे उपस्थित करत, त्याकडे दादा बारकाईने लक्ष देत असत. उद्या २२ जुलै रोजी, अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचाही वाढदिवस आहे.
Indie Journal

ईडीस जाऊया शरण!

Opinion
अनेक पक्षांचे नेते ईडीच्या कारवायांना घाबरतात. कारण त्यांच्या अनेकविध संस्था व उद्योग आहेत. त्यामुळे आपले कोणतेही आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी ते ईडीविरुद्ध ‘ब्र’देखील काढत नाहीत. सोनिया व राहुल यांच्या राजकारणाबद्दल कोणाचे काहीही आक्षेप असतील. परंतु ते निर्भय राहिले. ईडीचा थेट सामना करून, त्यांनी हे ब्रह्मास्त्र निष्प्रभ केले.
Indie Journal

बारामतीकरांचा उठाव!

Opinion
वास्तविक भाजपबरोबर अल्पायुषी सरकार स्थापल्यानंतर दादा जेव्हा माघारी परतले, तेव्हा त्यांना उपमुख्यमंत्री करून, शिवाय अर्थखात्यासारखे महत्त्वाचे खाते देऊन साहेबांनी त्याना त्यांच्या चुकांबद्दल बक्षीसच दिले होते. त्यामुळे दादांची ताकद आणखीनच वाढली.
Indie Journal

बोंबीलवाडीतील ढोंगी लोक

Opinion
आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा, अशी भाजपची तऱ्हा आहे. एकनाथ शिंदे यांचे सचिव सचिन जोशी यांची तपास यंत्रणांमार्फत चौकशीही झाली होती. परंतु त्यांनी भाजपच्या दिशेने पलटी मारताच, शिंदे आणि सचिन जोशी हे हुतात्मा होण्याऐवजी भाजपच्या दृष्टीने पुण्यात्मा बनले आहेत.
इंडी जर्नल

हिंदुत्वाचे सोंग आणि अव्वल दर्जाचे ढोंग!

Opinion
एक वर्ष होऊन गेल्यानंतरही शिंदे-फडणवीस सरकारची लोकप्रियता वाढलेली नाही. उद्धव ठाकऱ्यांना प्रचंड सहानुभूती मिळत असून, त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. उलट खोके आणि मिंधे गट म्हणून लागलेला कलंक पुसण्याचा आटोकाट प्रयत्न शिंदेंकडून सुरू आहे.
इंडी जर्नल

शिंदेंचा फडणवीसांविरोधात 'उठाव'!

Opinion
‘केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’, या प्रचाराची जागा ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या प्रचाराने घेतली. ‘मिंधे गट, मिंधे गट’ ही प्रतिमा बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले असून, देवेंद्रजींचा रिमोट मी झुगारून देत आहे, असेच त्यांना दाखवायचे आहे.

महाराष्ट्र कोण नासवतंय?

Opinion
संभाजीनगर, मुंबईतील मालाड-मालवणी, अकोला, शेवगाव, संगमनेर, जळगाव आणि आता कोलहापूर. रामनवमी उत्सवापासून गेल्या तीन महिन्यांत सदैव आपले पुरोगामित्व मिरवणाऱ्या महाराष्ट्रातील आठ शहरांत जातीय तणाव निर्माण झाला. कधी निमित्त रामनवमी उत्सवाची मिरवणूक, तर कधी कुठली पोस्ट, कधी एखादी अफवा किंवा किरकोळ मारामारीचे पर्यवसान दंगलीत.
इंडी जर्नल

केसीआर यांचे संशयास्पद राजकारण

Opinion
टीआरएस, म्हणजेच आता बीआऱएस किंवा भारत राष्ट्र समितीची तेलंगणात सत्ता आहेच. परंतु आता महाराष्ट्रातही हातपाय पसरण्याचा या पक्षाचा इरादा आहे. येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बीआरएसने नोंदणीदेखील केली आहे.
इंडी जर्नल

महाराष्ट्रातही कर्नाटक पॅटर्नच?

Opinion
कर्नाटकात तिरंगी लढत होती. तर महाराष्ट्रात शिंदेसेना-भाजप विरुद्ध महाविकास आघाडी (मविआ) अशी लढत आहे. महाविकासमध्ये वंचित आघाडीही अप्रत्यक्षपणे आली, तर मविआची ताकद लक्षणीय प्रमाणात वाढेल. कर्नाटकात बोम्मई सरकार हे प्रत्येक ठेक्यात ४० टक्के पैसे खाते, हे समीकरण मतदारांच्या मनावर बिंबवले गेले. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार हेदेखील खोके वा मिंधे सरकार म्हणून बदनाम झालेले आहे.
इंडी जर्नल

हेगडे आणि अर्स यांचा कर्नाटक

Opinion
१९८९ नंतरची काँग्रेसची कर्नाटकातली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. या निमित्ताने कर्नाटकातील रामकृष्ण हेगडे आणि देवराज अर्स यांच्याबद्दल चार शब्द लिहिलेच पहिजेत.
Indie Journal

आपच दिल्लीचा बाप!

Opinion
दिल्लीतील केजरीवाल सरकारला कामच करू न देण्याच्या दृष्टीने मोदी सरकार नायब राज्यपालांचा आपल्या प्याद्यासारखा उपयोग करून घेत होते. परंतु आता, राज्याचे प्रशासकीय अधिकार हे दिल्ली सरकारकडेच असतील, असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने केला असून, त्यामुळे यापुढे नायब राज्यपालांना अरेरावी करता येणार नाही.
इंडी जर्नल

शरद पवारांचे राष्ट्रीय बलस्थान

Opinion
शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाच्या दिलेल्या राजीनाम्यामुळे हा आठवडा गाजला. साहेबांनी आपली ताकद जनतेला व दादांनाही दाखवली. राज्यातली सत्ता गेली असली, तरीदेखील पवारांचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व अबाधित आहे. त्यांनी पदत्याग करू नये, यासाठी नीतीशकुमार यांच्यापासून ते सोनिया गांधींपर्यंत अनेकांचे त्यांना फोन आले, असे सांगण्यात येते.
Indie Journal

परिवर्तनाच्या प्रवाहातला ‘अर्जुन’

Opinion
‘दलित पँथर : एक अधोरेखित सत्य’ हा डांगळे यांचा ग्रंथ अलीकडे खूप गाजला. आता ‘परिवर्तनाच्या प्रवाहातले अर्जुन डांगळे’ असा ग्रंथ प्रसिद्ध झाला असून, तो डॉ. मिलिंद कसबे यांनी संपादित केला आहे.
Indie Journal

राजकारणातील धर्माधिकारी!

Opinion
अध्यात्माला फक्त ध्यानधारणेची नव्हे, तर मध्यस्थीचीही जरूरी असते. राजसत्ता आणि परमेश्वर या सत्तेच्या दोन केंद्रांमध्ये परस्परसंवाद घडवून आणण्यासाठी अध्यात्माला बडव्यांची गरज असते.
Indie Journal

धर्माच्या अफूचे झिंग झिंग झिंगाट...

India
नीतिमान मंत्री संजय राठोड, निर्मळ विचारांचे खासदार राहुल शेवाळे, ईडीमुक्त आनंद अडसूळ, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर आणि असेच इतर अनेक अमर्याद पुरुषोत्तम.. शिवाय महाराष्ट्रासाठी आपले सारसर्वस्व वाहणारे समृद्ध विचारांचे मुख्यमंत्री एकनाथजी यांच्या उपस्थितीत शरयू किनारी महाआरती झाली, तेव्हा हजारो उपस्थित लोक आणि टेलिव्हिजनवरून हा अभूतपूर्व सोहळा पाहणारे करोडो प्रेक्षक उन्मनी अवस्थेत गेले...
Indie Journal

लोटांगणवादी पत्रकारिता

India
आणीबाणीत इंदिरा गांधींनी वाकायला सांगितल्यावर प्रसारमाध्यमांनी त्यांच्यासमोर लोटांगणच घातले, अशा आशयाची टीका लालकृष्ण अडवाणी यांनी केली होती. परंतु २०१४ नंतर बहुसंख्य माध्यमांनी स्वयंस्फूर्तीनेच मोदी सरकारसमोर लोटांगण घातले!
Indie Journal

या राहुल गांधींचं काय करायचं?

India
तुम्हाला पंतप्रधान मोदींशी लढायचे आहे, की सावरकरांशी ते ठरवा आणि संभ्रमित होऊ नका, असा सबुरीचा सल्ला देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शांत करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. परंतु पक्षाचा अध्यक्ष राहिलेला नेता पुन्हा पुन्हा घोडचुका करत असल्यास काय म्हणणार!
Indie Journal

शिवसेनेची जागा घेण्याचा ‘राज’निर्धार

Opinion
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हिंदुत्ववादाची बाजारपेठ विस्तारत चालली आहे. भाजप, शिवसेनेचे दोन गट आणि मनसे हे चार खेळाडू त्यात खेळत आहेत.
Indie Journal

आम्ही म्हणू, तोच हिंदुत्ववादी!

Opinion
राहुल गांधी असोत की मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री असताना कमलनाथ यांनी हिंदू धर्माबद्दलचे आपले प्रेम लपवलेले नव्हते. हिंदुत्व आणि धार्मिकता अथवा हिंदू धर्माचे प्रेम या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हिंदुत्वाचे राजकारण मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्याबद्दल शत्रुभाव ठेवून चालते.
Indie Journal

हिंदुत्वाचे महाराष्ट्रातील ठेकेदार आम्हीच!

Opinion
उद्धव ठाकरे यांच्या पक्षास हिंदुत्वविरोधी ठरवून बाद करायचे. तो पक्ष नष्ट झाला, की नंतर शिंदे यांचा गट भाजपयुक्त करायचा आणि त्याच्या पुढच्या टप्प्यात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सरंजामदारी शिलेदारांना व वारसांना जवळ करून, धुलाई यंत्रातून स्वच्छ करायचे, ही भाजपची व्यूहरचना आहे.
Indie Journal

सोनिया गांधींच्या कारकिर्दीवर एक प्रकाशझोत

Opinion
नवा रायपूर येथे काँग्रेसच्या ८५व्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना, माजी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले, अशा आशयाची बातमी प्रसिद्ध झाली होती. परंतु त्यानंतर हे वृत्त्त फेटाळून लावण्यात आले. आज दैनंदिन कार्याचा भार सोनियाजींवर नाही आणि प्रकृतीच्या कारणांमुळे गेली काही वर्षे त्या पूर्वीइतक्या सक्रियही नाहीत. परंतु या निमित्ताने सोनियाजींच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकायला हरकत नाही.
Indie Journal

मीडिया लाईन: महाराष्ट्राचा आवाज कुठाय?

Opinion
महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे कारस्थान कशा प्रकारे रचण्यात आले, हे उघड झाले असले तरी घटना, लोकशाही आणि कायदेशीर प्रक्रिया यांची पायमल्ली कशी झाली, हे सर्वोच्च न्यायालयात त्यातील बारकाव्यांसह अधोरेखित करण्यात आले आहे.