पहलगाम आतंकवादी हल्ल्याबाबतही तेच झाले. त्यामुळे त्यानंतरच्या कारवाईत एकही देश भारताच्या बाजूने उभा राहीला नाही! याउलट तुर्की, चीन, अझरबैजान, इराण वगैरे देश पाकिस्तानच्या बाजूने उभे राहिले.
देशाला स्वातंत्र्य कोणामुळे मिळाले? यापेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वातंत्र्यलढ्यात योगदान नाही. हे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना सांगण्याचे काम पाठीचा कणा उरलेल्या मुख्य प्रवाहातील माध्यमांचे होते. मात्र तसा कणा कोणी दाखवला नाही.
सर्वोच्च न्यायालयाने लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) या भारतातील प्रमुख अभियांत्रिकी आणि बांधकाम कंपनीच्या याचिकेवर निर्देश देताना निविदा प्रक्रीया पुनश्च राबवण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा निविदा प्रक्रीयेला स्थगिती देण्याचा सज्जड दम भरला आहे. पण यावरती मुख्य धारेतील माध्यमात कुठेही चकार चर्चा नाही.
सत्तेचे स्तुतीपाठक विकृत ट्रोल अंधभक्त म्हणजे देशभक्त! असे समीकरण तयार झाले आहे. चित्रपटातील डायलॉग वापरुन स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या पंतप्रधानांना हाच 'नया इंडिया' अपेक्षित होता का? असा प्रश्न पडतो.
मविआ सरकारने गुजरात प्रमाणेच ६०:२०:२० अशी तीन टप्प्यांत एफआरपी देण्याची सूचना केली. ही सूचना शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणारी असल्याचा शेतकरी संघटनांनी दावा केला. पण त्यांना विचारतो कोण?
एकेकाळी पुण्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या काँग्रेस व सुरेश कलमाडी यांच्या पश्चात पुण्यात काँग्रेसला वाली असलेला नेता नाही. २०१४ नंतर कॅग राळेगणसिध्दीच्या स्वयंसेवकाप्रमाणेच निद्रीस्त अवस्थेत आहे. सब चंगा सी अशी भूमिका आहे. मात्र हे मीडिया ट्रायलचे प्रकार तेव्हापासून वरचेवर सुरुच आहेत.